सुधारित बाजार समिती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी सांगलीसह जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. बंदमुळे सुमारे दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली. बाजार समिती सुधारणा कायदा त्वरित मागे घ्यावा अशी आग्रही मागणी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. सुधारित बाजार समिती कायद्यामध्ये सध्याच्या संचालक मंडळाऐवजी प्रशासक मंडळाच्या हाती कारभार सोपविण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे बाजार समित्या डबघाईला येणार असून स्थानिक पातळीवरील व्यापारी, अडते, शेतकरी, हमाल यांची अवस्था बिकट होणार आहे. शेतकरी वर्गाचीही आर्थिक लूट होण्याचा धोका असल्याने सर्वच बाजार समित्यासह शेतकरी, व्यापारी, हमाल यांनी या प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा