मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं बेमुदत उपोषण आज (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात येऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर शिंदेंच्या हस्ते फळांचा रस घेत जरांगेंनी उपोषण सोडलं. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. आतापर्यंत जे कधीच घडलं नाही, ते आज घडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला जालन्यात आले. त्यांचे मराठा समाजाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत.”

Devendra Fadnavis On PM Modi
Narendra Modi : पंतप्रधान मोदी नवरात्रीत करतात कडक उपवास; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते फक्त…”
Ahmednagar, accused ran away,
अवघ्या शंभर मीटर अंतरावर पोलीस ठाणे, तरी पोलिसांच्या…
Jaisingh Ghosale, Shivsena Thackeray group,
शिवसेना ठाकरे गटाचे जयसिंग घोसाळे शिंदे गटात दाखल, रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का
PM Narendra Modi
PM Narendra Modi : “विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवा”, पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Narendra Modi Speech in Thane
Narendra Modi Marathi Speech : “महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय…”, ठाण्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी मराठीतून संवाद; म्हणाले…
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Supriya Sule Dandiya
पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, “गुंडगिरी…”
Ajit Pawar On Sunil Shelke
Ajit Pawar : “प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा, अजित पवारांनी भर सभेत टोचले कान; म्हणाले, “जरा…”
Vellore, Reliance projects, Ratnagiri, employment,
रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विरहित; २० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार – उदय सामंत

“मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे”

“या टाळ्यांचा विजय होईल हा शब्द देतो. तुमची टाळी वाया जाणार नाही. मी २९ ऑगस्टला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकवेळी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे,” असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, एवढं…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीआधी मनोज जरांगेंचं वक्तव्य

“शिंदेंनी आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असं सांगितलं”

“मला माझा समाज प्रिय आहे हे मी आधीपासून सांगत होतो. समाजाच्या हिताचा निर्णय घेईन आणि त्याशिवाय मागे हटणार नाही हे मी प्रत्येकवेळी सांगितलं आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे. त्यांनीही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असं सांगितलं आहे,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.