पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या पुढील टप्प्यात निवडण्यात आलेल्या शहरांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यादीमध्ये एकूण २७ शहरे आहेत. त्यामध्ये राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे. औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे या पाच शहरांची स्मार्टसिटीच्या पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या शहरांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या अन्य शहरांमध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि उज्जैन, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर, राजस्थानमधील अजमेर आणि कोटा, आंध्र प्रदेशातील तिरुपती, गुजरातमधील बडोदा, उत्तर प्रदेशातील कानपूर, वाराणसी आणि आग्रा कर्नाटकमधील हुबळी-धारवाड, मंगळुरू, शिवमोगा आणि तुमाकुरू यासह इतर राज्यांतील शहरांचा समावेश आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची निवड झाली होती.
27 Cites to be smart.5 Cities from Maharashtra.Aurangabad,Nagpur,Thane,Kalyan-Dombiwali &Nashik declared #smartcities by @MVenkaiahNaidu pic.twitter.com/135XDPLf9W
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) September 20, 2016