Nitin Gadkari on secular thoughts: महाराष्ट्र संताची ही भूमी आहे. तसेच ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांचीही आहे. प्रत्येक व्यक्तीमधून जे चांगले आहे, ते आपण घेतले पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांची विशेषतः अशी होती की, विजय मिळवल्यानंतर त्यांनी परधर्मीय पूजा मंदिरे उध्वस्त केली नाहीत. विरोधी पक्षात असलेल्या महिलांचा सन्मान केला आणि त्यांना घरी परत पाठवले. म्हणजे एक अर्थाने त्यांनी आदर्श राजा कसा असतो, हा परिचय करून दिला. सेक्युलर शब्दामध्ये सर्वधर्म समभावाचे सर्वात चांगले उदाहरण कुणाचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजे आहे. याचा मला विश्वास आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी पुणे येथे उपस्थित असताना त्यांनी सेक्युलर शब्दावर जोर देऊन समाज विचारशून्यतेकडे चालला आहे, असे म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा