महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी परिस्थिती आली आहे की दोन प्रमुख पक्ष फुटले आहेत. शिवसेना मागच्या वर्षी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या वर्षी. त्यानंतर आता काँग्रेस पक्षही फुटणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनीही काँग्रेसमधले लोकही यायला इच्छुक आहेत असं म्हटलं होतं. तसंच आमदार बच्चू कडू यांनीही हेच वक्तव्य केलं. या सगळ्या चर्चा सध्या होत असताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर सूचक उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे सुशीलकुमार शिंदेंनी?

“मला असं मुळीच वाटत नाही की काँग्रेस पक्ष फुटेल. काँग्रेस पक्ष हा विचारांनी पक्का आहे. एकदा काँग्रेस पक्ष फुटला ही वस्तुस्थिती आहे. पण यापुढे असं होईल असं वाटत नाही.” असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य

महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती आत्ता आली आहे ती पाहात बसण्यापेक्षा जास्त आत्ता तरी काही करु शकत नाही. राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांनी नवी प्रथा सुरु झाली आहे. आता पुढे बघायचं काय काय घडतं आहे? असं उत्तर सुशीलकुमार शिंदेंनी दिलं आहे. इतकंच नाही तर निवडणुका जवळ येत आहेत. जनतेला जे काही झालं आहे ते आवडलेलं नाही. त्यामुळे जनताच निवडणुकांच्या वेळी त्यांना धडा शिकवेल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

जे काही घडलं आहे त्यावर आता काय बोलणार? पुढे काय काय घडतंय बघावं लागेल. कशा तऱ्हेने सरकार चालवलं जातं ते बघू. टिळक स्मारकाच्या पुरस्कारावर मात्र त्यांनी नो कॉमेंट इतकंच उत्तरल दिलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं त्यानंतर मी शरद पवारांना भेटलो नाही असंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

Story img Loader