गडचिरोली : नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देशविरोधी लढाई आहे. परकीय शक्ती आणि ‘आयएसआय’सारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांची ती लढाई आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र दिनी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी दामरंचा आणि ग्यारापत्ती या अतिसंवेदनशील गावातील नागरिकांशी संवाद साधला. सी-६० जवानांचा गणवेश परिधान करून एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश त्यांनी दिला.  जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. मी यापूर्वीही दोन वेळा गडचिरोलीत मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करत आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असे त्यांनी सांगितले. 

devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी दामरंचा, ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. सोबतच सी ६० जवानांचा सत्कारदेखील केला. दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एकल भवनाचे लोकार्पण केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगमाचा आढावा घेत विविध निर्देश दिले.

शहरी नक्षलवाद मोठी समस्या

आज शहरी नक्षलवादाची मोठी समस्या आहे. पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांची दिशाभूल करून ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे जाळे ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते. गडचिरोलीत ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याचे काम मोठय़ा प्रमाणात होत आहे. सूजरागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

रस्ते, पोलीस केंद्रांना विरोध चुकीचा

एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा या सीमेवरील गावात मागील दीड महिन्यापासून आदिवासी आंदोलनाला बसले आहेत. त्यांचा प्रस्तावित खाणी, रस्ते बांधकाम व पोलीस मदत केंद्रांना विरोध आहे. आदिवासींची दिशाभूल करून काही शक्तींनी त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. त्यावर आमची नजर असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यार्थिनींची गळ.. यावेळी ग्यारापत्ती येथील विद्यार्थिनींनी फडणवीस यांना विशेष विनंती केली, ती ऐकून सर्वानीच त्यांच्या विनंतीला दाद दिली, तर फडणवीस यांनी सुध्दा त्यांची मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आम्हाला शाळेत जाण्यासाठी एसटी बस हवी, करोनानंतर दोन वर्षांपासून गावात बस आली नाही. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पण बस नसल्याने शिक्षणात खंड पडत आहे, असे विद्यार्थिनींनी सांगितले. त्यांचे म्हणणे एकूण घेत फडणवीस यांनी मागणी लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Story img Loader