गडचिरोली : नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देशविरोधी लढाई आहे. परकीय शक्ती आणि ‘आयएसआय’सारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांची ती लढाई आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र दिनी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी दामरंचा आणि ग्यारापत्ती या अतिसंवेदनशील गावातील नागरिकांशी संवाद साधला. सी-६० जवानांचा गणवेश परिधान करून एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश त्यांनी दिला.  जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. मी यापूर्वीही दोन वेळा गडचिरोलीत मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करत आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असे त्यांनी सांगितले. 

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी
नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी
Human chain against potholes in Nagpur
नागपुरात खड्डयांच्या विरोधात मानवी श्रृंखला
Kalyan Dombivli hawker removal chief suspended
कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित
Bhayandar, Shiv Sena Thackeray group, Clash Between Two Women Leaders, fight, viral video,
Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
Woman Naxal Commander, Woman Naxal murder,
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…

दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी दामरंचा, ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. सोबतच सी ६० जवानांचा सत्कारदेखील केला. दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एकल भवनाचे लोकार्पण केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगमाचा आढावा घेत विविध निर्देश दिले.

शहरी नक्षलवाद मोठी समस्या

आज शहरी नक्षलवादाची मोठी समस्या आहे. पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांची दिशाभूल करून ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे जाळे ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते. गडचिरोलीत ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याचे काम मोठय़ा प्रमाणात होत आहे. सूजरागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

रस्ते, पोलीस केंद्रांना विरोध चुकीचा

एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा या सीमेवरील गावात मागील दीड महिन्यापासून आदिवासी आंदोलनाला बसले आहेत. त्यांचा प्रस्तावित खाणी, रस्ते बांधकाम व पोलीस मदत केंद्रांना विरोध आहे. आदिवासींची दिशाभूल करून काही शक्तींनी त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. त्यावर आमची नजर असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यार्थिनींची गळ.. यावेळी ग्यारापत्ती येथील विद्यार्थिनींनी फडणवीस यांना विशेष विनंती केली, ती ऐकून सर्वानीच त्यांच्या विनंतीला दाद दिली, तर फडणवीस यांनी सुध्दा त्यांची मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आम्हाला शाळेत जाण्यासाठी एसटी बस हवी, करोनानंतर दोन वर्षांपासून गावात बस आली नाही. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पण बस नसल्याने शिक्षणात खंड पडत आहे, असे विद्यार्थिनींनी सांगितले. त्यांचे म्हणणे एकूण घेत फडणवीस यांनी मागणी लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.