दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली. यानंतर सरकारने याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या एसआयटी चौकशीला विरोध करण्यात आला आहे. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सरकारतर्फे जाणूनबुजून या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या निर्णयाविषयी शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी कायमच मनाचा मोठेपणा दाखवला आहे असं गजानन काळेंनी म्हटलं आहे. ती पोस्ट चर्चेत आहे.

काय आहे गजानन काळेंची पोस्ट?

#अस्सलठाकरे

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

आदरणीय राजसाहेब ठाकरे असो किंवा शर्मिला वहिनी… ठाकरेंचा मनाचा मोठेपणा काय असतो हे नेहमी दोघांनी आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून कायमच दाखवले आहे …

ठाण्याला सेनेचा महापौर बसावा म्हणून मनसेच्या ९ नगरसेवकांचा पाठिंबा देणे असो नाहीतर वरळी मध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार न देणे असो ,आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी कायम राजकारणापलीकडे नातं जपलं …

याउलट मुंबईतील मनसेचे ६ नगरसेवक खोके देवून फोडणे असो नाहीतर राजसाहेबांवर भाषण केले म्हणून केसेस टाकणं असो.मनसे हा संपलेला पक्ष म्हणून आदित्य यांनी केलेली विधाने असो अशी अनेक उदाहरणं देता येतील की यांच्याकडून मात्र कायमच राजकारणच करायचा प्रयत्न केला गेला …

फरक स्पष्ट आहे. अशी पोस्ट गजानन काळे यांनी केली आहे.

शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंबाबत काय म्हटलं आहे?

आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही आरोप झाले असून राज्य सरकारने त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही एकाच कुटुंबातील आहात, त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, आदित्य असे काही करेल, असे मला वाटत नाही. चौकशा कुणीही कुणाच्या लावू शकतो. आम्ही पण याच्यातून खूप गेलो आहोत.”

Story img Loader