Ganesh Naik vs Eknath Shinde Thane Fuardian Minister : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मोठ्या यशामुळे भाजपाचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे भाजपाने गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यातही आक्रमक राजकारण सुरू केलं आहे. राज्य मंत्रिमंडळात भाजपाने गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील एकमेव चेहऱ्याला संधी दिली असून नाईक हे जिल्ह्यावरील स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सोपवण्यात आलं आहे. नाईक यांच्यापाठोपाठ डोंबिवलीतील पक्षाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले किसन कथोरे यांना ताकद देताना “तुमच्यामागे मुख्यमंत्री उभा आहे” असं जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दुसऱ्या बाजूला गणेश नाईक हे नवी मुंबईसह ठाण्यात जनता दरबार भरवत आहेत. तसेच पुढील काही महिन्यात ठाण्याच्या विविध भागात जनता दरबार भरवणार असल्याचं त्यांनीच जाहीर केलं आहे. भाजपाचे हे ‘दरबार’ त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी पूरक ठरावेत अशा पद्धतीची योजना आखण्यात आली असली तरी यामागे शिंदे यांची कोंडी करण्याचे राजकारण सुरू आहे का, अशी कुजबूजही सुरू झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा