Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावतीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार आहे. या अनुषंगाने ती अमरावतीत पोहचली आहे. यावेळी तिने राजकारणात जाणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं. अल्पावधीत भरपूर प्रसिद्धी मिळालेली ही नृत्यांगना आहे. गौतमी पाटीलने आत्तापर्यंत विविध शहरांमध्ये कार्यक्रम केले आहेत. सबसे कातील गौतमी पाटील असंही तिला म्हटलं जातं. आता याच गौतमीने राजकारणात जाणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतमी पाटील आणि गर्दी समीकरण ठरलेलं

गौतमी पाटील ( Gautami Patil ) आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहण्यास मिळतं. तसंच तिच्या कार्यक्रमांची चर्चाही अनेकदा रंगते. कारण त्यात राडाही होतो, कधी खुर्च्याही तुटतात, कधी वादावादीही होते. पश्चिम महाराष्ट्रात गौतमीचे कार्यक्रम जास्त प्रमाणावर होतात. दही हंडीच्या दिवशीही गौतमीचे लावणीचे कार्यक्रम सादर होतात. आता अमरावतीत गौतमी ( Gautami Patil ) पहिल्यांदाच आली आहे. गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) प्रसिद्धी आणि तिच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे दोन प्रश्न सतत उपस्थित होतात. एक प्रश्न असतो गौतमी पाटीलच्या लग्नाचा आणि दुसरा असतो ती राजकारणात कधी जाणार याचा? आता अमरावतीत पहिल्यांदाच आलेल्या गौतमीने राजकारणात कधी जाणार यावर भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर, सूरज चव्हाणला शुभेच्छा देत म्हणाली…

गौतमी पाटील अमरावतीकरांबाबत काय म्हणाली?

“मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे. अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. प्रेक्षकांना मी भेटले आहेत, प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत. संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळतं आहे. मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं.” असं गौतमीने सांगितलं.

गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. गौतमी पाटीलचा नाच पाहण्यासाठी लोक लांबून येऊन त्या ठिकाणी गर्दी करतात.

गौतमी पाटील राजकारणात जाणार का?

राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. मी राजकारणात जाणार नाही. मी कलाकार आहे, मी माझी कला सादर करत असते. राजकारणाशी माझा काही काहीही संबंध नाही आज हे पुन्हा एकदा सांगते मी राजकारणात जाणार नाही. असं गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) सांगितलं.

अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गौतमीचा सल्ला काय?

बाहेरुन शिक्षणासाठी अमरावतीत येणाऱ्या मुलांना आणि मुलींना मी सांगेन की तुम्ही या ठिकाणी बिनधास्त राहा. अन्याय झाला तर बिनधास्त नडा, कुणाच्याही दबावाखाली राहू नका. तसंच स्वतःची काळजी घ्या असा सल्ला गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) विद्यार्थ्यांना दिला आहे. एबीपी माझाशी तिने संवाद साधला. त्यावेळी तिने हे वक्तव्य केलं आहे.

गौतमी पाटील आणि गर्दी समीकरण ठरलेलं

गौतमी पाटील ( Gautami Patil ) आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहण्यास मिळतं. तसंच तिच्या कार्यक्रमांची चर्चाही अनेकदा रंगते. कारण त्यात राडाही होतो, कधी खुर्च्याही तुटतात, कधी वादावादीही होते. पश्चिम महाराष्ट्रात गौतमीचे कार्यक्रम जास्त प्रमाणावर होतात. दही हंडीच्या दिवशीही गौतमीचे लावणीचे कार्यक्रम सादर होतात. आता अमरावतीत गौतमी ( Gautami Patil ) पहिल्यांदाच आली आहे. गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) प्रसिद्धी आणि तिच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे दोन प्रश्न सतत उपस्थित होतात. एक प्रश्न असतो गौतमी पाटीलच्या लग्नाचा आणि दुसरा असतो ती राजकारणात कधी जाणार याचा? आता अमरावतीत पहिल्यांदाच आलेल्या गौतमीने राजकारणात कधी जाणार यावर भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर, सूरज चव्हाणला शुभेच्छा देत म्हणाली…

गौतमी पाटील अमरावतीकरांबाबत काय म्हणाली?

“मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे. अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. प्रेक्षकांना मी भेटले आहेत, प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत. संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळतं आहे. मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं.” असं गौतमीने सांगितलं.

गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. गौतमी पाटीलचा नाच पाहण्यासाठी लोक लांबून येऊन त्या ठिकाणी गर्दी करतात.

गौतमी पाटील राजकारणात जाणार का?

राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. मी राजकारणात जाणार नाही. मी कलाकार आहे, मी माझी कला सादर करत असते. राजकारणाशी माझा काही काहीही संबंध नाही आज हे पुन्हा एकदा सांगते मी राजकारणात जाणार नाही. असं गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) सांगितलं.

अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गौतमीचा सल्ला काय?

बाहेरुन शिक्षणासाठी अमरावतीत येणाऱ्या मुलांना आणि मुलींना मी सांगेन की तुम्ही या ठिकाणी बिनधास्त राहा. अन्याय झाला तर बिनधास्त नडा, कुणाच्याही दबावाखाली राहू नका. तसंच स्वतःची काळजी घ्या असा सल्ला गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) विद्यार्थ्यांना दिला आहे. एबीपी माझाशी तिने संवाद साधला. त्यावेळी तिने हे वक्तव्य केलं आहे.