सलग पाच दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशी उफाळून आला. रेल रोको, रास्ता रोको करत त्यांनी संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. यामुळे पालकमंत्र्यांनी सिन्नरचा रस्ता धरला. निफाड तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी तीन तास मनमाड-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक रोखून धरली. रास्ता रोकोचा फटका माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहन ताफ्यालाही बसला.
नाशिकला सलग पाच दिवस गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्ेा.शासनाने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. त्यमुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले. निफाड तालुक्यात गारपिटीने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. या भागात वातावरण तप्त असल्याने पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आले. त्यांच्या वाहनांचा ताफा सिन्नरच्या दिशेने रवाना झाला. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुसरीकडे लगतच्या निफाडमध्ये आंदोलनाचे सत्र सुरू झाले होते. काही वेळातच शेकडो शेतकऱ्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई-मनमाड रेल्वे मार्गावर ठाण मांडत राजेंद्रनगर एक्स्प्रेस तीन तास रोखून धरली. मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या अनेक गाडय़ांना आंदोलनाचा फटका सहन करावा लागला.दुसरीकडे उगाव रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी शेतीची अवजारे रस्त्यावर पेटविण्यात आली.याबाबत महाजन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी निफाडला जायचे होते, पण वेळ मिळाला नसल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा