माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. यानंतर सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभी असलेली वाहनं मराठा आंदोलकांनी जाळल्या आहेत. सोळंके यांच्या घरातील साहित्यही जाळण्यात आलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जमावानं सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढला. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्नही केला. पण, संतप्त झालेल्या जमावानं सोळंकेंच्या घरावर दगडफेक केली. नंतर पार्किंगमधील वाहनं फोडली आणि पेटवून दिले.

Finance Minister Ajit Pawar
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या काळातील शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजना बंद होणार? कारण काय?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Omprakash Rajenimbalkar likely to join Mahayuti minister Pratap Sarnaik
“खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर महायुतीचेच!”, पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत

हेही वाचा : अजित पवार गटातील आमदाराच्या घरावर दगडफेक, वाहनं जाळली; सुप्रिया सुळे फडणवीसांवर संतप्त होत म्हणाल्या…

सोळंकेंच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक संस्था आणि नगरपालिकेवर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, “गावबंदीपर्यंत आम्ही समजू शकत होतो. पण, वाहनांची तोडफोड आणि एसटी जाळण्यात येत आहेत. आमदारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. गेल्यावेळी जगात प्रशंसा होईल, असं आंदोलन मराठा समाजानं केलं होतं.”

“आताची स्थिती कुणालाही आवडणारी नाही. मूळ मागणी आणि उददेश बाजूला राहिल. आंदोलन भरकटू नये. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे,” असं आश्वान महाजनांनी दिलं.

हेही वाचा : “जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का?”, ठाकरे गटातील खासदाराचा सवाल

“मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कायमस्वरूपी आणि टिकणारे आरक्षण द्यायचं असेल, तर ते कायदेशीर द्यावं लागेल. शिष्टमंडळ चर्चेला पाठवण्यासाठी जरांगे-पाटलांना आवाहन केलंय. शिष्टमंडळ आल्यावर चर्चा करू,” असं गिरीश महाजनांनी म्हटलं.

Story img Loader