उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात महात्मा गांधींचा खुनी असलेल्या नथुराम गोडसेचं उद्दातीकरण केलं गेलं आहे असं वक्तव्य फोटो दाखवत अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार यांनी राईट टू रिप्लायमध्ये हा मुद्दा समोर आणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात अशी गोष्ट घडणं योग्य नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे. मात्र त्यांच्याच मतदारसंघात जैताला रोडवर नथुराम हिंदू महासभा झेंडा लावण्यात आला आहे. स्वतंत्र भारतातला पहिला आतंकवादी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली हे उभ्या जगाला माहित आहे. अशा खुन्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असेल, त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल तर कायदा सुव्यवस्था कशी राहणार? या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनही झालं. तरीही काही घडलं नाही, हे असं चाललं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
rahul gandhi Arvind Kejriwal Sattakaran
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

महापुरूषांचा अपमान केला जात असेल तर

आपण ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल किंवा महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या महान व्यक्तींबाबत सगळ्यांना सन्मान आहे. असं असताना आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही घटना घडते आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात. हे तर ताजं उदाहरण आहे म्हणून सांगितलं. अशी कितीतरी उदाहरणं मी किंवा इतर सहकारी देऊ शकतात. मध्यंतरी आम्ही आणि आमच्या सहकारी पक्षांनी मुंबईत मोर्चाही काढला होता. देशातले जे महापुरूष आहेत त्यांच्याबाबत बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यासंदर्भात अक्षरशः ऐकवणार नाहीत अशी वक्तव्यं काहींनी केली. या सगळ्याकडे वेगळ्या प्रकारे बघण्याचा माझा दृष्टीकोन नाही. सत्ताधारी पक्षाचे मान्यवर, प्रवक्ते, आमदार या सगळ्यांना आवर घातला पाहिजे. आमच्याकडे कुणी बोलत असेल तर त्यांनाही आवर घातला पाहिजे अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

अनिल देशमुख यांची काय चूक होती?

अनिल देशमुख यांची काल तुरुंगातून सुटका झाली आहे. १४ महिने ते तुरुंगात होते. त्यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने १०० कोटींची खंडणी वसुली केल्याचे आरोप केले. मात्र पुरावा काहीही नाही. तरीही हे आरोप झाले आणि त्यांना १४ महिने तुरुंगात काढावे लागले. संजय राऊत आपल्या सभागृहाचे सदस्य नाहीत ते संसदेचे सदस्य आहेत पण त्यांनाही तुरुंगात जावं लागलं. आम्हीही आरोप करतो मग तुमच्या आमदारांना तुरुंगात टाकणार आहात का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला काय सहन करावं लागलं हे आपण जरा विचार करून पाहा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader