विद्युत प्रवाहाची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने ३२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमधल्या केतूर २ येथे घडली आहे. शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केतूर २ येथील येथील तात्याराम कोकणे यांच्या शेळ्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडल्या आहेत.

त्या गोठ्यावरुन महावितरण कंपनीच्या खांबावरुन घरगुती वीज जोडणी दिलेली केबल जात आहे. पहाटे ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट या शेळ्यांना लागला. यामुळे ३२ शेळ्या जागीच मृत्यू झाल्या. घटनास्थळी गाव कामगार तलाठी माने यांनी भेट दिली आहे.केतुर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सोमनाथ खरात यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी अशी मागणी कोकणे कुटुंबियांनी केली आहे.

Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Two years rigorous imprisonment for astrologers who claim to have a child
भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : न्यायदानातील विलंबही कारणीभूत
Raj Thackeray, Gondia, Raj Thackeray on Badlapur,
“बदलापूरची घटना मनसे पदाधिकाऱ्यांमुळे उघड,” राज ठाकरे यांचा दावा
Sambhajiraje chhatrapati (1)
“…नंतर सरकार आणि मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये”; महिला अत्याचाराच्या घटनांवरून संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया!
man suicide due to father-in-laws troubles Crime against six people
सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
Narendra Modi
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं कोलकात्यातील बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान; लाल किल्ल्यावरून भाषणात म्हणाले, “काही चिंताजनक गोष्टी…”

याबद्दल तात्याराम कोकणे यांचे चिरंजीव बापूसाहेब कोकणे यांनी आपलं साडेतीन ते चार लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. शासनाकडून मदत मिळावी अशी आपली अपेक्षा असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. कोकणे यांनी सांगितलं, आमच्या ४५ शेळ्या मेंढ्या होत्या. त्यापैकी करंट लागून ३२ शेळ्यांचा मृत्यू झाला. नदीचं पाणी वाढल्यानं आम्ही शेळ्यामेंढ्या चरायला आणल्या होत्या. सकाळी ६ च्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. तलाठी आणि वैद्यकीय अधिकारी पाहणी करून, पंचनामा करून गेले आहेत. शवविच्छेदनही करण्यात आलं आहे. आता शासनाकडून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.