रत्नागिरी: रत्नागिरीतील उत्पादित माल आता थेट कोकण रेल्वेच्या माध्यमातून जेएनपीटी बंदरात जाणार आहे.  यासाठी कोकण रेल्वेने निर्यात व आयात क्षेत्रात रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरीतील उत्पादने आता जेएनपीटी बंदरात पाठवने शक्य झाले  आहे. याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या वीस मिनी कंटेनरने करण्यात आला आहे. या करिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगाच्या पाठीवर अनेक देशात रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर  उत्पादने  पाठवली जातात.  त्याप्रमाणं  विविध उत्पादने येथे आयात ही होतात. यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेक मधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती. पण आता कोकण रेल्वेने या विषयात मोठे पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूकीची यंत्रणा उभी केली आहे. यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात पाठवण्यात येणार आहे. याचा शुभारंभ रत्नागिरीच्या गद्रे मरीन एक्सपोर्ट च्या निर्यात मालाने करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, गद्रे मरीन एक्सपोर्टचे  अर्जुन गद्रे, कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितीत होते. रत्नागिरी स्थानकातून हे पहिले मिनी कंटेनर रेक रवाना करण्यात आले असून

यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे कडून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.  कोकणातील मत्स्य आणि फळ प्रक्रिया उद्योगांकरिता हि मोठी सुविधा कोकण रेल्वेने उपलब्ध केली आहे. कोकणातील उद्योजकांनी  कोकण रेल्वेच्या या उपक्रमाला साथ द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले आहे.