विधिमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज(सोमवार) सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावर सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत, सभात्यागही केला. या सर्वच घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर, निलंबित केलेल्या भाजपाच्या सर्व १२ आमदारांनी राजभवनावर जाऊन या कारवाई विरोधात राज्यपालांना निवदेनह सादर केले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा आमदारांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. लोकशाही मूल्यांची आज ठाकरे सरकारने अंत्ययात्रा काढली. भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने रचलं असल्याचा आरोप शेलार यांनी जाहीरपणे केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा