वाई: महाबळेश्वर उन्हाळी पर्यटन हंगामासाठी दि २१ मे पासून २५ मेपर्यंत सलग पाच दिवस राज्यपाल रमेश बैस महाबळेश्वरला येत आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील व पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी वेण्णालेक व परिसरात पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला, यावेळी पालिका अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक हंगामामध्ये होणाऱ्या गर्दीसोबतच वाहतूक कोंडीची देखील समस्या पर्यटकांसह स्थानिकांना सतावते. तासंतास वाहतूक कोंडी होते. स्थानिक प्रशासनाच्यावतीने याबाबत पावले उचलण्याची मागणी होत आहे. मागील कित्येक वर्षे हंगाम पूर्व नियोजनाची बैठकच झाली नसून पालिका पोलीस महसूल व वनविभाग अशी संयुक्त बैठक झाल्यास समन्वयाने या कोंडीवर उपाय करता येऊ शकतात. उन्हाळी हंगामासाठी १५ जूनपर्यंत सातारा वाहतूक शाखेच्यावतीने १५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिंम यांनी दिली.

planned of ladaki bahin vote bank in Marathwada
मराठवाड्यात ‘लाडक्या बहिणीं’च्या मतपेढीचा ‘योजना’बद्ध आकार
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
rain prediction, in some parts of maharashtra,
राज्यात परतीचा पाऊस परत, “या” जिल्ह्यांना इशारा
Traffic Congestion Mumbai Ahmedabad Highway,
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोंडी, वर्सोवा पुलापासून चिंचोटीपर्यंत वाहनांच्या रांगा
trips to explore forts in maharashtra visit to historical forts in maharashtra
सफरनामा : दुर्गभ्रमंती
tourism minister girish mahajan announces five star hotel and underwater boat project in sindhudurg
सिंधुदुर्गात पंचतारांकित हॉटेल अन् पाण्याखाली बोट प्रकल्प ; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
tiger
नागपूर: पर्यटनाचा पहिलाच दिवस अन् वाघ…
rain red alert pune marathi news
पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

हेही वाचा – सांगली : पलूसमधील लक्ष्मी बझारला आग, ४० लाखांचे नुकसान

हेही वाचा – “…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”

राज्यपाल रमेश बैस मागील वर्षी आपल्या कुटुंबासह येथे पर्यटनास आले होते. यावेळी २१ मेपासून २५ मेपर्यंत राज्यपालांचा महाबळेश्वर दौरा असणार असून याची तयारी जिल्हाप्रशासनाकडून सुरु आहे. राजभवन येथे त्याअनुषंगाने युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.