राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी काल (५ नोव्हेंबर) राज्यात मतदान झाले. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज (६ नोव्हेंबर) होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी राजकीय नेत्यांना आपापल्या प्रभाव क्षेत्रातील ताकदीचा या निमित्ताने अंदाज येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. परंतु, ग्रामपंचयातींच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे. राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी काल (५ नोव्हेंबर) मतदान झाले. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक झाली. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूकही झाली. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे २५ हजार जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ७४ टक्के मतदान झाले असून १८५ निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. तर, राजकीय नेतेमंडळींसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. राजकीय पक्ष आपापली पॅनेल तयार करून रिंगणात उतरतात. तरीही सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असा दावा करण्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. यंदाही हेच अनुभवास येण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांतच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. परंतु, ग्रामपंचयातींच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे. राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी काल (५ नोव्हेंबर) मतदान झाले. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक झाली. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूकही झाली. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे २५ हजार जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ७४ टक्के मतदान झाले असून १८५ निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. तर, राजकीय नेतेमंडळींसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. राजकीय पक्ष आपापली पॅनेल तयार करून रिंगणात उतरतात. तरीही सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असा दावा करण्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. यंदाही हेच अनुभवास येण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांतच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.