महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती समाजाविषयी एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात या वक्तव्याचा समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, ” राज्यपाल कोश्यारी नाही का म्हणाले होते की महाराष्ट्रातले गुजराती आणि मारवाडी निघून गेले तर महाराष्ट्र काय करेल? मूळात पहिल्यांदा ते गुजराती मारवाडी त्यांच्याकडे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले ना? महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा जी काही जडणघडण झाली आहे त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक लोक बाहेरून आले, उद्योजक झाले, मोठे झाले. हे आपल्याला कसं नाकारता येईल?” असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उत्तर दिलं. पुण्यातल्या व्याख्यान कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा