शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी (१९ जून) शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. पुन्हा एकदा ते या यामदारांना गद्दार म्हणाले. आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. यावर एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यानंतर आता गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांच्याकडे (ठाकरे गट) बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. ठिक आहे, परंतु ३५ वर्ष आम्ही तिथेच घासली आहेत. त्यांनी आमची बॅक हिस्ट्री चेक करावी (इतिहास तपासावा). आम्ही घरांवर तुळशीपत्र ठेवून कामं केली आहेत. गद्दारी करायचीच असती तर नारायण राणेंनी केली तेव्हाच गेलो असतो. त्यावेळी मी आमदार होतो आणि त्यावेळीही आम्हाला ऑफर होती. राज ठाकरे गेले तेव्हाही गद्दारी करू शकलो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही.

Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Devendra Fadnavis Statement about Teli Samaj Wardha
वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…
Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला

हे ही वाचा >> “…तर आमची मनं वळली असती”; गुलाबराव पाटलांनी सांगितलं ११ आमदार फुटल्यानंतर ‘वर्षा’वर काय घडलं?

गुलाबराव पाटील म्हणाले, “यावेळी मात्र विचारांचा विषय आला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेली शिवसेना लयाला जातेय असं वाटू लागलं होतं. सुरुवातीला जेव्हा काही आमदार तिकडे गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही. कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना (उद्धव ठाकरे यांना) सल्ले देत होता आणि ते त्याचं ऐकत होते. मी तर ३३ नंबरला (फुटलेल्या आमदारांमधले ३३ वे आमदार) गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो.” गुलाबराव एबीपीमाझाशी बोलत होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या खोकेबहाद्दर या टीकेलाही गुलाबरावांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला खोके बोलणारे कोण? तुमचं तिकडे काँग्रेसशी आय लव्ह यू सुरू आहे. त्यावर बोला.