महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाचं बहुमताचं सरकार असूनही गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतला अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. या सरकारला भाजपा आणि शिवसेनेचे नेते ट्रिपल इंजिन सरकार किंवा त्रिशूळ सरकार म्हणत आहेत. दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सरकारचं मार्मिक शब्दात वर्णन केलं आहे. पाटील म्हणाले, आमच्या सरकारचं कसं चाललंय? वर भाजपा, कंबर शिवसेनेची आणि हातपाय राष्ट्रवादीचे, असं चाललंय.

गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही स्थिर लोक आहोत. आमच्यावर गद्दारीचे आरोप झाले, वर्षभर आम्ही ते ऐकले. आम्ही त्यांना कामाने उत्तर देतोय. अरे तुम्ही कामाचं बोला रे! तुम्ही पण पालकमंत्री होता, तुम्ही चार वर्ष पालकमंत्री होता. तू तेरा गल्ला बता, मैं मेरा गल्ला बताता हूं, तुम्ही चार वर्ष पालकमंत्री होता. तुमच्याकडे ९ खाती होती. तसेच, त्यावेळी आजच्यासारखं तीन जणांचं सरकार नव्हतं, तेव्हा एकच सरकार होतं. आता तर तीन जणांचं सरकार आहे, वर भाजपा, मध्ये कंबर शिवसेना आणि हातपाय राष्ट्रवादीचे, असं चित्र आहे. तरी पण आम्ही कामं करत आहोत.

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

हे ही वाचा >> “अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत”, संभाजीराजेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले, “२०२४ पर्यंत…”

विरोधकांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आम्हाला त्यांच्याशी (विरोधक) भानगड करायची नाही, त्यांचा विरोधही नाही. कुठल्या पक्षावर बोलायचं नाही. परंतु, हेच लोक आमच्यावर बोलतात. हे लोक आधी आमच्यावर बोलायचे, पन्नास खोके, सबकुछ ओके अशा घोषणा द्यायचे. आता अजित पवार आमच्याबरोबर आल्यानंतर यांचं तोंड उघडत नाही. हे राष्ट्रवादीवाले आता काय बोलत नाहीत. मुळात ही राष्ट्रवादी कोणाची ते सिद्ध करा आधी. राष्ट्रवादी शरद पवारांची आहे की अजित पवारांची हे सिद्ध करा. तुम्ही अजित पवारांचा सत्कार करताय, तसेच शरद पवार झिंदाबाद म्हणताय, काय चाललंय.

Story img Loader