शिंदे गटातील नेते तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महादेवाशी तुलना केली आहे. करोना काळात भारत सरकारने अन्य देशांना केलेल्या मदतीचा संदर्भ देत मोदी यांनी केलेली मदत म्हणजे वैराग्याचे, महादेवाचे लक्षण आहे, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत. ते आज (१० फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> Cow Hug Day : ‘काऊ हग डे’ वरून केंद्र सरकारची माघार! निर्णय घेतला मागे, ‘हे’ आहे कारण

Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती

नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेवाभावी वृत्ती आहे. तुम्ही पाहिले असेल की करोनाकाळात अनेकांनी त्यांच्यावर राजकीय टीका केली. आपल्याकडे लसीकरणाची गरज असताना, आपल्या देशात १५० कोटी लोकसंख्या असताना तुम्ही बाहेरदेशात लसपुरवठा करत आहात, अशी टीका करण्यात आली,” असे तानाजी सावंत म्हणाले.

हेही वाचा >>> हरियाणा सरकारचे अजब धोरण! डॉक्टरांसाठी लागू केला नवा ड्रेस कोड, जिन्स परिधान करण्यास मनाई; मेकअपही…

…असा विचार मोदी यांनी केला नाही

“पण आपल्या भारताला विश्वाचा विचार करणारा नेता लाभला. मोदी यांनी जगाचा विचार केला. जगातील जनता तसेच भारतातील जनता यांच्यातील आत्म एकच आहे. म्हणूनच आपल्या देशात औषधांचा साठा करून ठेवायचा, असा विचार मोदी यांनी केला नाही,” असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा >>> सेन्सॉरशिप घालू शकत नाही सांगत, सुप्रीम कोर्टाकडून ‘बीबीसी’ विरोधातली हिंदू सेनेची याचिका निकालात

कित्येक देशात ३० ते ४० टक्के लोकांचा मृत्यू झाला

मोदी यांच्यात वैराग्याचे पर्यायाने महादेवाचे लक्षण आहे, असेही तानाजी सावंत म्हणाले. “आपली हर्ड इम्यूनिटी चांगली आहे. इतर देशांवर करोनाचा जास्त परिणाम झाला. कित्येक देशात ३० ते ४० टक्के लोकांचा मृत्यू झाला. म्हणूनच त्यांनी लसीचा पहिला हात जगाला दिला. दुसरीकडे आपल्याकडे लसीकरणाचेही काम सुरूच होते. म्हणूनच मी म्हणतो की हे वैराग्याचे लक्षण आहे. हे तर महादेवाचे लक्षण आहे,” असे सावंत म्हणाले.

Story img Loader