सांगली : गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आलेला हस्ताचा पाऊस नवरात्रीच्या माळेत सापडला. यामुळे आता दहा दिवस पावसाचा मुक्काम असल्याच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदारांबरोबरच काढणीला आलेल्या खरीप पिकांचे काय होणार याची धास्ती लागली आहे. आज सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. हस्त नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस झाले. मात्र, आजपासून नवरात्र सुरू झाल्याने हस्त नक्षत्राचा पाऊस नवरात्रीच्या माळेत सापडल्याची धारणा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आहे. यामुळे दसरा संपेपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>> मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?

villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Land mafia attempts to block bay by dumping debris from demolished buildings in Dombivli West
डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डेब्रिजचे,भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
mula mutha riverfront development project gets environment clearance
डोळ्यांचे पारणे फिटणार?
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
construction in natural drain in badlapur ignore by national green arbitration
बदलापुरातही नैसर्गिक नाल्यात बांधकाम; राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेनंतर बांधकामावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, काल सायंकाळी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे पावसाबरोबर गारपीटही झाली. या भागातील द्राक्ष बागांच्या काड्या व फुटलेले कोंब मोडले. गारांच्या माऱ्याने पाने फाटत त्याची चाळण झाली. तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मका ही पिके जमीनदोस्त झाली. तासगाव तालुक्यातील लोढे, कौलगे, सावर्डे, चिंचणी, मनेराजुरी, खुजगाव, वाघापूर, आरवडे, बस्तवडे तुरची, राजापूर यांसह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले. अर्ध्या तासात मणेराजुरी परिसरात ३६.५ मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसापूर्वी दहा मिनिटे गारांचा तडाखा बसला. या गारांमुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. डोळे फुगलेल्या व फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे डोळे गारांच्या माऱ्याने मोडून पडले तर काही द्राक्ष बागांची पाने गारांच्या माऱ्याने फाटली असून शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. काढणीचा खरीप पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे.