गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टोकदार शब्दांत टीका केली जात आहे. अलीकडेच भास्कर जाधव यांनी दापोली येथील आक्षेपार्ह भाषणावरून रामदास कदमांचा समाचार घेतला होता. रामदास कदम यांनी संबंधित सभेतून उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. या घडामोडीनंतर रामदास कदम यांनी पुन्हा भास्कर जाधवांवर पलटवार केला आहे.

भास्कर जाधव यांचा मेंदू सडला असून डोकं नासलं आहे, त्यामुळे नासलेल्या डोक्यातून नासलेले विचार येत आहेत. माझ्यासारखा माणूस त्यांना काहीही किंमत देत नाही, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे. ते रत्नागिरीत ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

हेही वाचा- “…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील” ‘त्या’ विधानावरून भास्कर जाधवांची खोचक टीका

कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आणखी संघर्ष पाहायला मिळणार आहे का? असा प्रश्न विचारला असता रामदास कदम यांनी भास्कर जाधवांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. भास्कर जाधवांची औकात आहे का? आपण आपल्या बरोबरीच्या माणसासोबत संघर्ष करत असतो. आता मी नारायण राणेंसोबत संघर्ष केला, मी कोकणात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. पण भास्कर जाधवांची एवढी औकात आहे का? असा सवाल रामदास कदमांनी विचारला आहे.

हेही वाचा- “होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले…

पुढे ते म्हणाले की, भास्कर जाधव हा कालचा गद्दार आहे, त्याने शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खूपसून पुन्हा शिवसेनेत आला. तो गद्दार मला शिकवणार का? त्याचा मेंदू सडला आहे आणि डोकं नासलं आहे. नासलेल्या डोक्यातून नासलेले विचारच बाहेर येणार, याला कोकणात कोण विचारतं? माझ्यासारखा माणूस तर याला काहीही किंमत देत नाही, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे.

Story img Loader