राष्ट्र सेवा दल कडून लोकशाही उत्सव अंतर्गत मिरज येथे तृतीयपंथी मोना तुपलोंडे सांगली यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. लोकशाही उत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथील तृतीयपंथी मोना तुपलोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, समाजातील वंचित घटकांना भारतीय संविधानाने सन्मान मिळवून दिला व समानतेची आणि संधीची समानता दिली. म्हणून भारतीय संविधान जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

हेही वाचा- पुणे – सातारा मार्गावर वाहनांची गर्दी; पाचगणी, महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाटही हाऊसफुल्ल

State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
ugc dharmendra pradhan marathi nmews
अग्रलेख : प्रधान की सेवक?
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी

यानंतर वाळवे गल्ली येथे प्रजासत्ताक संविधान फेरी काढण्यात आली. यात संविधानाचे व प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगणारे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या. यामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर सावित्री उत्सव अंतर्गत निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहीत शिंदे यांनी केले तर समतेची राष्ट्रभक्ती गीते किरण कांबळे व राहत सातारमेकर यांनी गायिली व कार्यक्रमाचे आभार किरण कांबळे यांनी मानले.

हेही वाचा- पहाटेचा शपथविधी शरद पवारांची राजकीय खेळी? जयंत पाटलांच्या दाव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यावेळी जे घडलं…”

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन हेरंब माळी, वैष्णवी जाधव, प्रसाद पवार, दीपक मगदूम, प्रकाश पवार, ऐश्वर्या माने, राज कांबळे, अक्षय पवार, सौरभ सूनके, गौरव घाटगे, अदिती घाटगे, योगेश घाटगे, शिवानंद हिप्परगी, प्रशांत जाधव, रवी शितोळे आदींनी केले होते.

Story img Loader