मला मराठा समाजापेक्षा कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांना पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली. तुम्ही कुणीही हट्ट करु नका, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या दिवशी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जो वेळ मागितला आहे तो नेमका किती वेळ द्यायचा? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.

मनोज जरांगे पाटील अखेर पाणी पिणार

गावकऱ्यांनी त्यांना मागचे दोन तास पाणी पिण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेणार आहेत. आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज त्यांना उठून उभंही राहता येत नाहीये. मगाशी त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा खाली कोसळले. माझ्यासाठी समाजापेक्षा कुणीही मोठं नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”

मराठा समाजाला सरसकट आरक्षण हवं हीच आमची मागणी

मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवा आणि त्याविषयीचे निर्देश द्या अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांचा फोन काही वेळापूर्वी आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ आम्हाला द्या. त्यावर विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्ही थोडा म्हणजे किती वेळ द्यायचा? आम्ही ४० वर्षे थांबलो आहोत. थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ द्यायचा? त्यामुळे आता मुदतवाढ देण्यास आमचा विरोध आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

१ नोव्हेंबरपासून तिसरा टप्पा

१ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्ही मराठा समाजाच्या मागणीबाबत आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना बोललात का? याचं उत्तर आलेलं नाही.याचा अर्थच असा होतो की केंद्र सरकारला तुम्ही काहीही सांगितलं नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते तरीही त्यांच्याशी संवाद साधला नाही हा प्रश्न सांगितला नाही मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा? क्युरेटिव्ह पिटिशन १३ ऑक्टोबरलाच दाखल झाली आहे. त्यानंतर १६ तारखेला आपण विचारलं होतं. पण पंतप्रधानांना काही माहीत असतं तर पंतप्रधानांनी शिर्डीत उल्लेख केला असता. आमचं आंदोलन शांतेत सुरु आहे. मात्र हे शांततेचं युद्ध सरकारला परवडणार नाही. असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Story img Loader