महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमचं ऐकलं नाही, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “भाजपा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता. मात्र, २०१९ साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकलं नाही.”

Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा : “९५ साली अजित पवार कुठे होते? तेव्हा…”, ‘त्या’ विधानावरून शहाजीबापू पाटलांचा खोचक सवाल; जयंत पाटलांनाही टोला!

“भाजपा आणि शिवसेना युतीने एकत्र…”

“राज्यात शिंदे-भाजपा सरकार कसे स्थापन झाले, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली नाही. २०१९ च्या विधानसभेत भाजपा आणि शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढली. त्यानंतर आलेल्या निकालात जनादेश भाजपा-शिवसेना युती सरकारसाच्या बाजूने होता. पण, उद्धव ठाकरेंनी मनाविरुद्ध २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. याला शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, म्हणाले “तुम्ही कोणतं धोतर…”

“सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना…”

“निवडून येणाऱ्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघाचा कायपालट व्हावा वाटतो. गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आमच्यापैकी अनेकांनी उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करावी, यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यात यशस्वी झालो नाही,” अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Story img Loader