महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमचं ऐकलं नाही, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “भाजपा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता. मात्र, २०१९ साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकलं नाही.”

Eknath Shinde defends cops on Badlapur Encounter
Akshay Shinde Encounter: “अक्षय शिंदे पळाला असता तर…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बदलापूर चकमकीवर विरोधकांना प्रत्युत्तर
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Eknath shinde appreciated mla Sanjay Gaikwad
मुख्यमंत्र्यांकडून गायकवाड यांचे कौतुक, उपमुख्यमंत्र्यांचे खडेबोल
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…

हेही वाचा : “९५ साली अजित पवार कुठे होते? तेव्हा…”, ‘त्या’ विधानावरून शहाजीबापू पाटलांचा खोचक सवाल; जयंत पाटलांनाही टोला!

“भाजपा आणि शिवसेना युतीने एकत्र…”

“राज्यात शिंदे-भाजपा सरकार कसे स्थापन झाले, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली नाही. २०१९ च्या विधानसभेत भाजपा आणि शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढली. त्यानंतर आलेल्या निकालात जनादेश भाजपा-शिवसेना युती सरकारसाच्या बाजूने होता. पण, उद्धव ठाकरेंनी मनाविरुद्ध २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. याला शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, म्हणाले “तुम्ही कोणतं धोतर…”

“सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना…”

“निवडून येणाऱ्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघाचा कायपालट व्हावा वाटतो. गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आमच्यापैकी अनेकांनी उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करावी, यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यात यशस्वी झालो नाही,” अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.