“हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली”, असं धक्कादायक विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पडसाद सामिजक आणि राजकीय पद्धतीने उमटले. यावरून आता पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“आमच्या हाताखाली त्यांनी काम करणं एवढी आमची लायकी नाही. आमची खरंच लायकी नाही. जातीनिहाय आम्ही लहान आहोत, ते मोठे आहेत. एखादा कलेक्टर कांबळे असला तर त्याच्या हाताखाली मराठा समाजाने काम कसं करायचं?” असा खोचक प्रश्न छगन भुजबळांनी विचारला.

Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
kolkata doctor rape case trinamool congress vs bjp controversy more intense after sc comment
सुनावणीनंतर राजकीय वाद; निदर्शनांमागे केंद्राचे कारस्थान बॅनर्जी; चेहरा उघड झाल्याची भाजपची टीका
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

हेही वाचा >> “लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची मराठ्यांवर वेळ”, जरांगे-पाटलांच्या विधानावर भुजबळ उद्विग्न होत म्हणाले…

ते पुढे म्हणाले की, मग त्या कलेक्टरच्यावर सुपर कलेक्टर नेमायला हवा. एखादा आदिवासी चीफ इंजिनिअर झाला तर कसं काय काम करायचं? एखादा सुपर चीफ इंजिनिअर नेमला पाहिजे. आमची लायकी नाहीय. मराठ्यांची सगळी लायकी आहे. ते आमच्यापेक्षा उच्च आहेत. म्हणून त्यांच्याकडे सगळी सुत्रे असली पाहिजेत. मराठा समाजातील मुलं शिकतात, कलेक्टर होतात, एसपी होतात. कशासाठी? शेवटी त्यांची चाकरी करायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे”, अशीही उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते?

“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होतं.