“ अनिल परब यांनी मंत्री असतानाही बेकादेशीर रिसॉर्ट त्यांनी बांधलं व ते माझं रिसॉर्ट असल्याचं सांगून त्याचा मालमत्ता कर देखील भरला. मंत्री महोदय स्वत: बेकायदेशीर बांधकाम करतात आणि त्यांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री परिवार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे करत आहेत. तर, अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईचे आदेशही दिल्या गेले आहेत. त्यानंतरही एखादा मंत्री मंत्रिमंडळात कसं राहू शकतो? अनिल परबची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ही आमची मागणी आहे.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज भाजपा कार्यालयातील पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे. याचबरोबरत अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरूंगात जावच लागणार असल्याचंही सोमय्या यांनी यावेळी बोलून दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे नोटिशीत म्हटले आहे. तर,या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यालयात पत्रकारपरिषद घेत, अनिल परब व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मोठी बातमी! अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस; ३१ ऑगस्टला हजर होण्याचे आदेश

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, ”अनिल परब यांनी बनाव केला, १२ ऑक्टोबर २०१७ रोजी टाउन प्लानिंगने कळवलं तर त्यानंतर अनिल परबने रिसॉर्ट बांधला. विना परवनगी बांधकाम केलं, सीआरझेडमध्ये केलं. त्यांना जो फोर्ज परवाना होता तो ५०० मीटरचा (५ हजार फूट)होता, त्यांनी १७ हजार ८०० स्क्वेअर फूट बांधकाम केलं. मुख्य मुद्दा असा आहे की अनिल परब यांनी, २६ जून २०१९ रोजी ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं होतं, की हे बांधकाम हे रिसॉर्ट माझं आहे. त्यांनी स्वतः २०१९-२० आणि २०२०-२१ चा मालमत्ता कर भरलेला आहे. त्यांच्या नावाने पावती आहे, त्यांच्या खात्यातून पैसे देण्यात आले. १७ डिसेंबर २०२० रोजी हा मालमत्ता कर भरला.”

“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप!

तसेच, ”एका सीएने अधिकृतरित्या महाराष्ट्र सरकाला अहवाल दिला, की हे रिसॉर्ट बांधण्यात ५ कोटी ४२ लाख ४४ हजार २०० रुपये खर्च झाले आहेत. अनिल परब यांनी एक दमडीचा खर्च देखील स्वतःच्या खात्यात दाखवलेला नाही. मग रिसॉर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला? सचिन वाझेचा वसुलीमधला पैसा होता? किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परब यांनी स्वतःच्या मित्राला, सदानंद कदमच्या नावाने हा रिसॉर्ट १ कोटी रुपयात करून टाकला. बांधकामाचा खर्च ५ कोटी ४२ लाख बाजारभाव ग्रामपंचायतीनुसार २१ कोटी आणि १ कोटीत अॅग्रीकल्चर लेन म्हणून विकला.” असं सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितलं.

‘ईडी’च्या नोटीसवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

याचबरोबर, ”अनिल परबच्या विरोधात आम्ही बेनामी मालमत्ता कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे. मनी लॉण्ड्रिंग झालं आहे ५ कोटी ४२ लाख खर्च केलेत, पण ते व्हाईटमध्ये दाखवले नाहीत म्हणून ईडीकडे तक्रार केलेली आहे. पर्यावरण मंत्रालय एमसीझेडमध्ये पाठपुरावा सुरू आहे आणि राष्ट्रीय हरित प्राधिकरणात सुनावणी सुरू झालेली आहे. माझी मागणी आहे, ईडीने बेनामी संपत्ती कायद्यानुसार, मनी लॉण्ड्रिंगमध्ये याची चौकशी केली पाहिजे. दुसरी बाब मंत्र्याने बेकायदेशीर बांधकाम केलं आहे, त्यावर कारवाईचे आदेशही दिल्या गेले आहेत. त्यानंतरही मंत्री मंत्रिमंडळात कसं राहू शकतो. अनिल परबची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ही आमची मागणी आहे.” असं यावेळी किरीट सोमय्या म्हणाले.

“…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार”

तर या अगोदर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत  अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.