मुंबई -आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्करोग, एचआयव्ही बाधित तसेच अन्य दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलेटिव्ह केअर)आवश्यकता असते. अशा रुग्णांची काळजी घेणे बऱ्याचवेळा घरच्यांनाही शक्य होत नाही. या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिनची इंजेक्शन्स देण्यासह मानसिक आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते. गोरगरीब रुग्णांना यासाठी येणारा खर्च परवडणारा नसतो तसेच काळजी घेणेही शक्य होत नाही हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता राज्यातील ३४ जिल्ह्यात ही ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात ‘पॅलेटिव्ह केअर’च्या या अंमलबजावणीत आरोग्य विभागाची वाटचाल कुर्मगतीने सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डॉक्टर व परिचारकांच्या आवश्यक पदांपैकी बहुतेक पदे भरण्यात आलेली नसल्याने खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत ही योजना प्रभावीपणे पोहोचू शकली नसल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरही मान्य करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा