ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं नाही,” असा सवाल जलील यांनी केला. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल गेट परिसरात काढलेल्या भव्य मूक मोर्चात बोलत होते. या मोर्चाचे रूपांतर हमखास मैदानातील सभेत झाले होते.

इम्तियाज जलील म्हणाले, “आत्ता मी केवळ एका पक्षाचं नाव घेत नाहीये, पण काँग्रेसवाले नेहमी असं म्हणायचे की आमच्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबादच्या नामांतराचा विषय नाही. त्यामुळे असा निर्णय होणार नाही. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं नाही.”

Arvind Kejriwal
Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, आपचा भाजपावर गंभीर आरोप
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Baba Siddique murder case, conspirator, person arrested from Haryana,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : कट रचणारा व शूटर्समधील दुवा पोलिसांच्या हाती, हरियाणातून एकाला अटक
BJP minister accused in multi state credit union scam Petition of the Deputy Commissioner of Police
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्यात भाजप मंत्र्यावर आरोप; पोलीस उपायुक्ताच्या याचिकेनंतर खळबळ पोलीस महासंचालकांकडेही बोट
varsha gaikwad criticized shinde govt
“लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार गुजरातच्या तुरुंगात, मग…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर हल्लाबोल!
natasha awhad post on baba siddique murder
“लॉरेन्स बिश्नोई गँगने माझ्या बाबांनाही…”; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट चर्चेत!
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”

“अशोक चव्हाणांचा समाचार घ्यायला मी नांदेडला देखील जाणार”

“नांदेडचे एक साहेब आहेत, अशोक चव्हाण. त्यांनी नीट ऐकावं, तुमचा समाचार घ्यायला मी नांदेडला देखील येणार आहे. त्यांनी केवळ या नामांतराला पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी आपल्याला इतिहासच शिकवला. इतिहासात काय झालं हे कुणीही नष्ट करू शकत नाही. इतिहासात चांगलं झालं, वाईट झालं ते इतिहासाचा भाग आहे,” असं जलील यांनी नमूद केलं.

“तू मला ओळखत नाही रे राजा, असे किती आले आणि गेले”

इम्तियाज जलील पुढे म्हणाले, “सोशल मीडियावर काही तरुण माझ्यावर चुकीच्या कमेंट करत आहेत. ते मला जशास तसं उत्तर देऊ असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘अरे तू मला ओळखत नाही रे राजा’. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले. चुकीच्या लोकांमध्ये अडकू नका. हे शहर आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचं आहे.”

हेही वाचा :

“जे लोक या सभेला आलेले नाहीत, त्यांची वाट लागणार आहे”

“आजच्या या सभेला जे आलेले नाहीत त्यांना देखील लक्षात ठेवलं जाईल. तुमच्यासाठी तुमचं राजकारण महत्त्वाचं असेल, मात्र आम्ही अशा राजकारणाला लाथ मारतो. जेव्हा आपल्या शहराच्या अस्तित्वाचा, ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा आपण एक ताकद बनून उभे राहू. त्यामुळे जे लोक या सभेला आलेले नाहीत, त्यांची वाट लागणार आहे,” असा सूचक इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.