अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड ते माणगाव दरम्यान शनिवारी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात जाणारे आणि कोकणातून येणारे प्रवासी तासंतास अडकून पडले होते. कोलाड ते माणगाव अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते. शिमगोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून हजारो चाकरमानी कोकणच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबई- गोवा महामार्गावरील वर्दळ वाढली होती.

हेही वाचा : महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट अपघात ! मुंबई, पुण्यात सर्वाधिक मृत्यू

shilphata road traffic update first day traffic jam dombivli kalyan
Shilphata Traffic : शिळफाटा मार्गावरील पहिला दिवस कसा होता? वाहतूक कोंडी झाली का?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Kalyan-Shilphata Road, Kalyan-Shilphata Road Traffic, Kalyan-Shilphata Road Road Closure, Kalyan-Shilphata Road Traffic diversion
Shilphata Traffic : शिळफाटा रस्त्यावर ३० मिनिटांच्या प्रवासाला २ तास, पर्यायी रस्ते उपलब्ध करूनही प्रवाशांची शिळफाट्याला पसंती, पर्यायी रस्ते कोंडीत
Tilari Ghat closed for all vehicles for repair of damaged protective embankment
खचलेल्या संरक्षण कठडा दुरुस्ती करिता तिलारी घाट सर्व वाहनासाठी बंद
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Tax issues with companies take contract of Mumbai Goa highway work
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला
Construction of Vadhavan Igatpuri highway to be handed over to NHAI Mumbai news
वाढवण-इगतपुरी महामार्गात निधीटंचाईचा ‘गतिरोधक’; संपूर्ण महामार्गच ‘एनएचएआय’कडे देण्याचा मुख्य सचिवांच्या बैठकीत सूर
Mumbai Ahmedabad National Highway , Traffic ,
राष्ट्रीय महामार्गावर ‘मेगाब्लॉक’

सकाळनंतर यात आणखीनच भर पडली. त्यामुळे कोलाड, इंदापूर आणि माणगाव या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. माणगाव, इंदापूर शहरांलगत असलेला अरुंद रस्ता आणि लेनची शिस्त न पाळल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली होती. बेशिस्त वाहन चालकांना आवर घालतांना वाहतूक पोलीसांना बरीच मेहनत घ्यावी लागत आहे.

Story img Loader