पंढरपूर : पुण्यातील धरणातून उजनी धरणात आणि भीमा नदीत येणारी आवक घटली आहे. मात्र सोमवारी आणि मंगळवारी भीमा नदीत सोडलेल्या पाण्याची आवक येत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता भीमा नदीत १ लाख ३५ हजार क्युसेक पाण्याची आवक आहे. शहरातील नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी गेल्याने स्थलांतरीत करण्यात आले आहे.

हेही वाचा : Nana Patole : “चुकीला माफी नाही”, विधानसभेच्या तिकीट वाटपासंदर्भात नाना पटोलेंचं मोठं विधान

Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
imd warned vidarbha and marathwada of heavy to very heavy rain for two more days
पावसाचे संकट आणखी गडद होणार!; वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह…
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

पुण्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला आणि वीर धरणातील आवक मंदावली. मंगळवारी सायंकाळी नीरा नदीत भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या धरणातून ४ हजार ५३७ क्युसेक तर वीर धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. त्याचा परिणाम नीरा नदीतून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे उजनी धरणातून दुपारी ३ वाजता भीमा नदीत १ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी येथील भीमा नदीत पोहचण्यास १२ ते १४ तास लागतात. त्यामुळे याचा परिणाम उद्या दिसून येणार आहे. असे असले तरी सोमवारी उजनी धरणातून सोडण्यात आलेले आणि नीरेतून सोडलेले पाणी मंगळवारी भीमा नदीत मिसळले. भीमेच्या पाण्याच्या पातळीत दुपारी वाढ झाली होती. गोपाळपूर येथील जुना दगडी पुलावर पाणी वाहत होते. त्या बाजूला असलेल्या शहरातील झोपडपट्टीधारकांना पालिकेने इशारा दिला.