सांगली : दानोळीचा ३२ वर्षाचा तरणाबांड नितीन कुमार पाटील. गेल्या दहा दिवसांपासून तो कोमात होता. अशा स्थितीतच त्यांने इहलोकीची यात्रा संपवित असताना दहा जणांना अवयवदान करून जीवदान दिले. त्यांचे हृदय मुंबईतील एका रूग्णाच्या शरीरात धडधडत राहणार आहे, तर अन्य अवयवाच्या माध्यमातून नऊ जणांना जग पाहण्याची संधी आणखी लाभणार आहे.

दानोळी (जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील नितीन गेल्या बारा वर्षांपासून फिट येण्याच्या आजाराने त्रस्त होता. आई-वडिलांनी औषधोपचार केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा आजार बळावला. अखेर त्याला सांगलीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र शरीर औषधोपचाराला अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. त्यातच तो कोमात गेला. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) जाहीर केले.

sushma andhare on chhagan bhujbal
“छगन भुजबळ व्हाया सुरत, गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांना…” ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar
“ही निवडणूक सोपी नव्हती, पण बारामतीकर कधी…”, शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले, “त्यांना त्याचा चमत्कार…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohla marathi news
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; ६ जुलै रोजी साताऱ्यात पाच दिवस मुक्काम

हेही वाचा: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; ६ जुलै रोजी साताऱ्यात पाच दिवस मुक्काम

कुटुंबियांनी आपला तरूण मुलगा वाचू शकत नसला तरी अवयवाच्या रूपाने तो जिवंत राहू शकतो असे समजून अवयव दानाचा निर्णय घेतला. सांगलीतील रूग्णालयातून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पारेख, डॉ. आनंद मालाणी, डॉ. संजय कोगेकर, डॉ. दिगंकर कोळी यांच्या वैद्यकीय पथकाने हृदय विमानाने मुंबईला पाठवले. आणि याचबरोबर यकृत, डोळे, त्वचा यांचेही दान दिल्याने दहा रूग्णांना नवे आयुष्य लाभले.