लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पावसाचा जोर कमी झाला असला तरी सांगलीत कृष्णेची पाणीपातळी इशारा पातळीजवळ तर मिरजेत इशारा पातळीच्यावर पोहचली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराच्या १० अधिकाऱ्यांसह शंभर जवान दाखल झाले आहेत. काल कोयनेतून ३२ हजार १०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ अपेक्षित आहे.

navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Navi Mumbai, price garlic,
नवी मुंबई : लसणाच्या दरात तेजी, घाऊक बाजारात प्रतिकिलो ४०० रुपयांवर
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
displaced families in Dharavi redevelopment project
ठाण्याच्या वेशीवर नवी ‘धारावी’!

शनिवारी सकाळी आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी ३९ फुट ९ इंच असून इशारा पातळी ४० फूट व धोका पातळी ४५ फूट आहे तर, कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी ५१ फुट ९ इंच पातळी असून येथील इशारा पातळी ४५ फूट व धोका पातळी 57 फूट आहे. आमणापूर येथील कृष्णेवरील पूल पाण्याखाली गेला आहे.

आणखी वाचा-दरड – पुराचा धोका लक्षात घेता सातारा जिल्ह्यात ७०० लोकांचे स्थलांतर

सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवाडे प्लॉट, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लॉट,साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळा रोड, जगदंब कॉलनी,पंत लाईन आदीसह पलूस, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील पूरबाधित क्षेत्रातील ४१२१ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून १० हजार क्युसेक विसर्ग वाढवण्यात येत आहे यामुळे पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून शनिवारी सकाळी देण्यात आला आहे.