तरडगाव: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर पावसाचे सावट आले आहे. आज तरडगाव(तरडगाव) मुक्कामी पावसाने हजेरी लावल्याने लाखो वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सातारा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे . साताऱ्यातील तरडगाव (ता फलटण) चांदोबाचा लिंब येथे आज मध्यम पावसात दुपारी साडेचार वाजता अलोट उत्साहात पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडले. लोणंद वरून अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण करून तरडगाव मुक्कामी आला. तोपर्यंत पालखी सोहळ्यावर पावसाचा जोरदार वर्षाव झाला. त्यामुळे दिंड्यांच्या मुक्कामातील राहुट्या साठी उभारलेल्या तंबूत पाणी शिरले. सगळीकडे चिखल झाला आहे.याच पावसात साडेसहा वाजता तळावर सर्व दिंड्या पोहोचल्या. पालखी तळावर चोपदारांनी दंड उंचावल्यावर सर्वत्र शांतता झाली. चोपदारांनी सूचना केल्या. समाज आरती पावसातच होऊन माऊली एक दिवसासाठी तरडगाव मुक्कामी विसावली. या पावसाने वारकऱ्यांच्या विश्रांतीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. पावसाचा अंदाज न आल्याने वेळीच खबरदारी न घेतल्याने वारकऱ्यांना चिखलातच मुक्काम करावा लागणार आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाळा समाज मंदिरे, मंगल कार्यालये, ग्रामपंचायतच्या मिळकतीमध्ये वारकऱ्यांचा मुक्काम आहे. ज्या ग्रामस्थांच्या घरी मुक्काम करता येईल तिथे वारकरी मुक्काम करत आहेत. तरीही अनेक वारकरी जागे अभावी प्रशासनाच्या मदतीच्या आशेवर आहेत.

हेही वाचा : “तुमची चार माकडं…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल; थेट नामोल्लेख करत म्हणाले…

Mumbai municipal corporation
विश्लेषण : देशातल्या सर्वांत श्रीमंत महापालिकेला घरघर? मुंबई महानगरपालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी चिंतेची बाब का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
name of a Bangladeshi was found in the voter list of Narayangaon Gram Panchayat
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडलेल्या ३ जणांनी काढले होते नारायणगाव येथे आधारकार्ड
Information about impact of union budget 2025 on agriculture in marathi
विश्लेषण : कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 

सातारा जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवा सुविधेसाठी मोठी व्यवस्था केलेली आहे. त्यांना कोणतीही अडचण भासू नये अशी काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. तरी आज अचानक आलेल्या पावसाने पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या व्यवस्थेत मोठी अडचण आली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाची शिकस्त सुरू आहे. वारकऱ्यांच्या निवासाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी फलटणच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधला असता वारीच्या ठिकाणी नेटवर्क यंत्रणा विस्कळीत होत असल्याने होऊ शकला नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यावेळी वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण त्यांच्या व्यवस्थेची खूप काळजी घेतली आहे. तरीही आज सकाळपासून पावसाचा अंदाज होता. त्यामुळे वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले आहेत. आपण वारकऱ्यांची काळजी घेत आहोत. जिथे शक्य आहे तिथे ताडपत्री टाकून कुठे काही व्यवस्था करता येते. तिथे करून वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावत आहोत. आमचे सर्व प्रशासन सध्या तरडगाव मध्ये आहे.

Story img Loader