वाई: वेचले (ता. सातारा) गावात शेताकडे सोयाबीनच्या पेरणीसाठी जात असताना रस्त्याच्या कडेच्या विद्युत जनित्राचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का लागून दोन बैलांचा मृत्यू झाला. वेचले (ता. सातारा) गावात चाहूर शिवारातील गोरख काटकर, राजेंद्र लोंढे, परबती भोसले हे आपल्या शेताकडे सोयाबीनच्या पेरणीसाठी सकाळी बैलगाडीतून जात होते.

या वेळी शिवारातील रस्त्याकडेला आसणाऱ्या विद्युत जनित्राचा (डीपी) वीज प्रवाह तांत्रिक अडचणीमुळे रस्त्यामध्ये साठलेल्या पाण्यात पसरला होता. त्यावेळी रस्त्यावरून बैलगाडी जाताना एका बैलाचा पाय त्या पाण्यात पडताच बैलाला विजेचा धक्का बसला आणि क्षणात दोन्ही बैल विद्युत जनीत्राकडे खेचले गेले. बैलगाडी शेजारील दगडावरुन पलटी होवून बैलगाडीतील तीघे जण खाली फेकले गेले आणि बैलगाडी पलटी झाली. त्यामुळे ते वाचले.

pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
nagpur, Dharampeth, pub license, drug abuse, noise disturbance, Nagpur pub, residential area, Shankarnagar, Ramnagar, political influence, police action, Nagpur news,
नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
Nagpur, pub, Shankarnagar to Dharampeth, drugs, ganja, police inaction, political leader, youth, nightlife, complaints, loud DJ, drug trafficking,
नागपूर : गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुण-तरुणी धुंद! ‘त्या’ पबला राजकीय वरदहस्त
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
Sandalwood, stolen, bungalow, Prabhat Street,
पुणे : प्रभात रस्त्यावर बंगल्यात शिरून शस्त्राच्या धाकाने चंदन चोरी, चंदन चोरट्यांची दहशत

हेही वाचा : सांगली: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या

सर्जा राजा नावाच्या बैलांनी आपल्या मालकावरील संकट आपल्यावर घेवून मालकाचे प्राण वाचविले. घटना स्थळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घालून शेतकऱ्याचे झाले नुकसान भरपाई देवू असे लेखी आश्वासन घेतले. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.