सोलापूर : राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी उजनी धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाने दुस-यांदा गठीत केलेल्या समितीने सकारात्मक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढण्याच्यादृष्टीने शासनाकडून लवकरच अध्यादेश जारी होण्याची अपेक्षा आहे. एका पाहणीनुसार या धरणात सध्या १४ टीएमसी एवढा गाळ साचला असून तो काढल्यास तेवढ्याच प्रमाणावर धरणात पाणीसाठवण क्षमता वाढणार आहे.

मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजनीसह जायकवाडी (छत्रपती संभाजीनगर), गोसी खुर्द (भंडारा), गिरणा (नाशिक) आणि मुळा (अहमदनगर) आदी पाच धरणांतील साचलेला गाळ काढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी मानके तयार करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीमार्फत मागविण्याचे ठरले होते. त्यानुसार समिती गठीत झाली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे या समितीला संपूर्ण अहवाल सादर करता आला नव्हता. त्यामुळे पुन्हा नव्याने दुसरी समिती गठीत झाली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ही माहिती दिली.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Impact of climate change on health Increase in patients coming to hospital for treatment
वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम; अंगदुखी,सर्दी -खोकला, ताप, घसा दुखीमुळे नागरिक त्रस्त
walking pneumonia incidence increasing in mumbai
विश्लेषण : मुंबईत ‘वॉकिंग न्युमोनिया’चा प्रादुर्भाव का वाढत आहे? लक्षणे काय? उपाय कोणते?

हेही वाचा : गोव्यातील कंपनीकडून अक्कलकोटच्या ठेवीदारांना गंडा

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान मानले गेलेल्या आणि शेतीकारण, अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचे केंद्रबिंदू मानल्या जाणा-या महाकाय उजनी धरणी धरणाची उभारणी १९८०-८१ साली पूर्ण झाली होती. त्यानंतर ४३ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ प्रथमच काढण्यात येणार आहे. त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. धरणात गाळमिश्रीत वाळू आहे. सुपीक शेतीसाठी गाळ शेतक-यांना उपलब्ध करून देता येईल. तर वाळू काढून त्याची विक्री केल्यास मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकणार आहे. गाळ काढण्यासाठी होणा-या खर्चापेक्षा जास्त महसूल वाळू विक्रीतून होईल, अशी अपेक्षा आहे.

यासंदर्भात शासनाने गठीत केलेल्या समितीने अंतिम अहवाल सादर केला आहे. धरणात गाळामध्ये ५० टक्के वाळू असून त्यानुसार वाळू, रेती आणि इतर घटक वेगळे करण्याचे नियोजन आहे. गाळ काढण्यासाठी किती मीटर खोल जायचे, गाळ काढताना जलाशयातील जीवसृष्टीला हानी न पोहोचण्यासाठी अकाॕस्टिकवाहिनीचा वापर करणे, जलाशयाचा परीघ किती, हे ठरवून त्याप्रमाणे गाळ काढण्यासाठी जलाशयात पोहोचण्याकरिता तात्पुरते रस्ते तयार करणेआदी बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे.

हेही वाचा : Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार

उजनी धरणात मागील वर्षी पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जेमतेम ६०.६६ टक्के पाणीसाठा झाला होता. परंतु नंतर चुकीच्या पाणी वाटप नियोजनामुळे धरणातील पाणीसाठा लवकर खालावला. गेल्या जानेवारीमध्ये हिवाळ्यातच धरणातील पाणीसाठा वजा पातळीवर गेला असून सध्या पाणीसाठा वजा ५३ टक्के एवढा खालावला आहे. त्याचा विचार करता धरणातील गाळ काढण्याची संधी आहे.

Story img Loader