सोलापूर : देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे. परंतु देशातील जनता आता मोदींना पुरती ओळखली आहे. म्हणूनच मोदी घाबरले आहेत. लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटत आहे. म्हणूनच ते पुन्हा पाकिस्तान, दोन समाजामधील द्वेषाची, खोटेपणाची भाषा वापरत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. दुपारी तळपत्या उन्हात लक्ष्मी मिल मैदानावर झालेल्या या सभेस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात आदींची व्यासपीठावर उपस्थित होते.

Archana Patil Chakurkar
अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा…मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

यंदाची लोकसभा निवडणूक केवळ जिंकण्याचे नव्हे तर संविधान बदलण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. आम्हांला संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे. कोणी कितीही प्रयत्न करीत असले तरी संविधान बदलू शकत नाही, असे नमूद करीत राहुल गांधी यांनी, मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. देशातील २२-२५ धनाढ्य उद्योगपतींना मोदी सरकारने १६ लाख कोटींची कर्जे माफ केली आहेत. कर्जमाफीची एवढ्या मोठ्या रकमेतून मनरेगासाठी २४ वर्षे वापरता आला असता. एवढ्याच पैशातून देशातील शेतकऱ्यांना २४ वर्षे कर्जमाफी मिळाली असती.

७० कोटी जनतेजवळ जेवढा पैसा आहे, तेवढाच पैसा २२-२५ धनाढ्यांच्या तिजोरीत आहे. त्यामुळे देशात आर्थिक विषमता वाढली आहे. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर, कामगार, तरूण सर्वांची निराशा झाली आहे. म्हणूनच देशातील आम जनता आज संविधान आणि लोकशाही वाचविण्याच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा…नांदेड : नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कंधार तालुक्यातील कळकावाडीतील घटना

देशातील प्रसार माध्यमे मोदींच्या दबावाखाली असून ही ‘गोदी मिडिया’ शेतकरी, कामगार, गोरगरीब, दलित, आदिवासींच्या दररोजच्या जगण्याच्या प्रश्नांवर चर्चा करीत नाही. माध्यमांमध्ये सूत्रसंचालन करणा-यांमध्ये देशातील ९० टक्के मागासवर्गीय, आदिवासी, शेतक-यांचे प्रतिनिधित्व करणारा एकही दिसत नाही.

दोनशे मोठ्या कंपन्यांमध्ये मराठा,धनगर व इतर बहुसंख्य बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व दिसत नाही. देशातील ७० टक्के जनतेकडून जीएसटीच्या माध्यमातून वसूल झालेला पैसा मूठभरांच्या फायद्यासाठी वापरला जातो. पारदर्शकतेचा अभाव असलेल्या निवडणूक रोख्यांमधून झालेला भ्रष्टाचार भयानक आहे, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधून जनसमुदायावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून गारूड केले. मोदी यांनी देशाला अन्यायाची राजधानी बनविली आहे, असा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने महिला, तरूण, शेतकरी, कामगार आदी सर्व घटकांसाठी दिलेल्या कल्याणकारी योजनांचा पुनरूच्चार केला.

हेही वाचा…येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर

वंचितचा उमेदवार काँग्रेसमध्ये

सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून भरलेली उमेदवारी परस्पर मागे घेतलेले राहुल गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या सभेचे औचित्य साधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गायकवाड यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले.