सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्या काळात कोणत्याही धर्माच्या मुद्यावर प्रचार करून मतदारांना आकृष्ट करता येणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाईल. तसेच निवडणूक आचारसंहिता काळात पेडन्यूजचे प्रकार थांबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास अवश्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

आगामी सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी देशपांडे सोलापुरात आले होते. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू होण्यापूर्वी मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या काही गोष्टी घडत असतील तर त्यावर कारवाई करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

हेही वाचा…आमदार गायकवाडांविरुद्धचे शुक्लकाष्ठ थांबेना….पुन्हा नवीन गुन्हा दाखल

निवडणूक आदर्श आचारसंहिता राबविताना त्या अनुषंगाने कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मतदारांवर आर्थिक आमीष दाखवून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने प्रभावित करता येणार नाही किंवा दबाव आणता येणार नाही. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणा गांभीर्याने लक्ष ठेवून राहणार आहे. विशेषतः कोणत्याही धार्मिक मुद्यावर प्रचार किंवा टीका टिप्पणी करता येणार नाही. जर कोठे तसा प्रकार आढळून आल्यास किंवा तशा तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशपांडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

निवडणूक आचारसंहिता काळात ‘पेडन्यूज’चे प्रकार घडतात. त्यावर प्रभावीपणे आळा घालताना आधुनिक तंत्रज्ञान, पोलिसांची सायबर शाखाआदी यंत्रणांची मदत घेतली जाते. मात्र आतापर्यंत पेडन्यूज प्रकारांना प्रभावीपणे आळा बसला नाही, अशी कबुलीही देशपांडे यांनी दिली.