सांगली: तब्बल दीड महिन्याच्या विलंबानंतर सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुययाला वरदान ठरणार्‍या चांदोली धरणातील पाणीसाठा बुधवारी ५० टक्के झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असल्याने शिराळा तालुक्यातील मोरणा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत असून सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी वाढत आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा तर पश्‍चिम भागातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाउस पडत आहे. पावसामुळे अख्खा जिल्हा ओलाचिंब झाला असून रात्रभर पावसाची हजेरी होती. मुरवणीचा पाउस होत असल्याने याचा फायदा विहीरीबरोबरच आटलेल्या विंधन विहीरींना होणार आहे. ओढ्या नाल्यांना अद्याप पाणी आले नसले तरी रानात पाणी साचू लागले असल्याने शेतकरी सुखावला आहे.

In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
National Sports Championship inaugurated in Uttarakhand sports news
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
Loksatta chawadi Ahilyanagar uday samant State Environment Minister Shambhuraj Desai Satara
चावडी: योग्य वेळी योग्य भूमिका
First-ever conference on tribal diseases in Nagpur experts from 17 countries will participate
आदिवासींच्या आजारावर प्रथमच नागपुरात परिषद… १७ देशातील तज्ज्ञ…
Friction between Mahayuti allies intensifies with guardian ministership issue
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला का गेले? राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मनोमीलन का नाही?
Construction of large water channels begins in Gorai Mumbai news
गोराईमध्ये मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात; काही गावांमध्ये पालिकेच्या कामाला विरोध
Akola , Bangladeshi Rohingya, Birth Certificate,
अकोल्यातून १५ हजारांवर बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र? किरीट सोमय्यांचा आरोप; ‘एसआयटी’मार्फत….

आणखी वाचा-साताऱ्यासह महाबळेश्वर वाईमध्ये जोरदार पाऊस; अंबेनळी घाटात दरड कोसळली

दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असून गेल्या २४ तासात धरणाच्या ठिकाणी ६७ मिलीमीटर पाउस झाला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणानदी दुथडी भरून वाहत असून झपाट्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. चांदोली धरणाची पाणी पातळी ६०६.३० मीटर झाली असून धरणातील पाणीसाठा १७.११ टीएमसी (क्षमता ३४.४०) झाला आहे. २४ तासात धरणामध्ये १.१६ टीएमसी पाणी वाढले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४.९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३६.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाउस मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १५.२, जत १४.२, खानापूर-विटा १०.४, वाळवा-इस्लामपूर ११.६, तासगाव १६, आटपाडी १०.२, कवठेमहांकाळ १७, पलूस ९.६ आणि कडेगाव ५.७.

Story img Loader