सांगली : सांगली जिल्हा नेतृत्वाची खाण असतानाही अद्याप विमानतळाची प्रतीक्षा मागणी करावी लागते हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले. सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सौहार्द या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते ‘जर्नालिस्ट असोसिएशन’च्यावतीने ‘लोकसत्ता’चे जिल्हा प्रतिनिधी दिगंबर शिंदे यांच्यासह शेखर जोशी, दत्ता कुलकर्णी, वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. विनोद परमशेट्टी, उद्योजक रोहन यादव, स्वप्नील शहा, प्रवीण शेट्टी यांचा सन्मानचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी आ. इद्रिस नायकवडी, जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, इंद्रजित घाटे, महंमद मणेर, डॉ. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांनी स्वागत केले, तर अध्यक्ष संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा