एपीएमसी बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत तीन ते चार पटीने आवक वाढली होती. मात्र आता आवक कमी होत असून मागील वर्षी एप्रिलमध्ये साधारणता एक लाख पेट्या दाखल झाल्या होत्या , मात्र आता ३५ हजार पेटी दाखल झालेली आहे. तर दुसरीकडे इतर राज्यातील आंब्याची आवक मात्र वाढली आहे.एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडी करता प्रसिद्ध असलेला हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली,परंतु उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हवामान बदल आणि पुन्हा पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने हापुस आंबा शेतकऱ्यांनी वेळे आधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन दाखल होत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा