Raigad landslid : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहील, असंही त्यांनी सांगितलं.

या घटनेला आता १७ तास उलटले आहेत. मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. खालापूर परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बचाव पथकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. एनडीआरएफच्या बचाव पथकांसह पनवेल महापालिकेचं बचाव पथक, सिडकोचे मजूर स्थानिक ट्रेकर्सचे समूहदेखी इर्शाळवाडीत मदतकार्य करत आहेत. तसेच आज (२० जुलै) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे ही नेतेमंडळीदेखील इर्शाळवाडीत दाखल झाली आहे.

pune 12 vehicles vandalized
पिंपरी : चिखलीत सराईत गुन्हेगाराकडून बारा वाहनांची तोडफोड
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Accident News
Road Accident : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे निघालेल्या ८ मित्रांवर काळाचा घाला; गावात एकाच वेळी पेटल्या चीता
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
labour iron rod pune news
मजुराच्या खांद्यातून सळई आरपार, एरंडवणे भागात दुर्घटना; अग्निशमन दलाकडून तातडीने मदतकार्य
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
Four people died in different accidents in Pune city
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

दरम्यान, काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी आतापर्यंत बचावपथकांनी केलेल्या कामाची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं असून या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. तसेच या गावातील जे लोक कामानिमित्त बाहेर पडले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे. भातलावणीसारख्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आश्रमशाळेत जी मुलं आहेत, त्यांचीही माहिती घेतली जात आहे.

हे ही वाचा >> पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!

हे ही वाचा >> Raigad Landslide: ..आणि शाळकरी मुलांमुळे गाव जागा झाला! प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं ठाकूरवाडीत नेमकं काय घडलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही खूप दुर्दैवी घटना आहे. मी आतापर्यंत अनेकांच्या नातेवाईकांना भेटलो आहे. सरकार त्यांच्या पाठिशी आहे, असा विश्वास मी त्यांना दिला. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत केली जाईल.

Story img Loader