अहिल्यानगरः शिक्षकच नाही तर शिकायचे कसे, असा प्रश्न पडलेल्या मोहा (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज, सोमवारी जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयातच शाळा भरली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी सांगितले की, मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरवले जातात. एकूण पाच शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र सध्या या ठिकाणी पहिली ते आठवीच्या वर्गासाठी केवळ तीन शिक्षक उपलब्ध आहेत. यामुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. या ठिकाणी निवारा बालगृहातील अनाथ, निराधार व वंचित घटकातील मुले शिक्षण घेतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा