Jayant Patil Criticize Raj Thackeray : पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२५ जुलै) केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टोला मारला. त्यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मूळ गोष्टींकडे म्हणजे पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? बहिणीला १५०० रुपये देणार, भावाला इतके देणार. राज्य सरकारकडे पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत. मूळ प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हेच महाराष्ट्र विधानसभेसाठी तुमचं कँपेन असलं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”

हेही वाचा >> Raj Thackeray : “लाडका भाऊ आणि लाडकी बहीण दोघं एकत्र राहिले असते तर..”, राज ठाकरेंची टोलेबाजी

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर जयंत पाटील( Jayant Patil Criticize Raj Thackeray) म्हणाले, “राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकचेय्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नव्हती. त्यांची त्या दोघांशीही ओळख होती. पण आता त्यात बोलण्यात अर्थ नाही. पुलाखालून पाणी बरंच वाहून गेलंय. दोन वेगळे पक्ष तयार झाले, दोन अस्तित्व तयार झाली.

“महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला समर्थन दिलंय. महाराष्ट्रातील लोकांना नैतिकतेचं महत्त्व आहे. नैतिकतेला महत्त्व देणारी महाराष्ट्रातील जनता आहे तोवर आम्हाला चिंतेचं कारण नाही. त्यामुळे आमचा पक्ष का फुटला, कोणत्या कारणाने फुटला. हे सर्व देशाला नाही, तर जगाला माहितेय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या मागे उभी आहे. नाहीतर १० पैकी ८ जागा आणि ९वी जागा आल्यातच जमा आहे. एवढा परफॉर्मन्स सहसा दिसत नाही. तो आज दिसतोय”, असं जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader