सोलापूर : महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या अडचणीत आणले तरी भविष्यात हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> Breaking: अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?

माढा लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी दौरा करून टेंभुर्णी (ता. माढा ) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कणाहीन निवडणूक आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्वादी काँग्रेस पक्ष आहे. देशातील विविध २८ राज्यांत हा पक्ष विखुरला आहे. त्यापैकी २३ राज्यांतील पक्ष प्रमुखांनी शरद पवार यांच्याच नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. परंतु ही वस्तुस्थिती असताना निवडणूक आयोगाने केवळ महाराष्ट्र विधिमंडळातील बहुसंख्य सदस्य एका बाजूने गेले म्हणून हा चुकीचा निर्णय दिला आहे,असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा >>> “घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना….”, लेखक अरविंद जगताप यांची सूचक पोस्ट चर्चेत

माढा मतदारसंघात शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या महिलांना धमक्या दिल्या जातात. परंतु कोणी कितीही त्रास दिला तरी उज्ज्वल भविष्यकाळ आमचाच आहे. पक्ष आणि चिन्ह पळविले गेले. परंतु शरद पवार यांच्यावर असलेले सामान्य माणसाचे प्रेम कोणीही हिरावून नेणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. माढा भागासह सोलापूर जिल्ह्यात अभिजित पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही शरद पवारांची साथ सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. बंद पडलेला साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला आणि उत्तमप्रकारे चालवून दाखविला आहे.  एवढेच नव्हे तर शेतक-यांच्या उसाला  चांगला भाव देऊन माढा भागात ऊस  दराची स्पर्धा लावली आहे. परंतु अभिजित पाटील यांच्यावर केवळ राजकीय दबावातून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र शिखर बँकेकडून जाणीवपूर्वक कारवाई करून त्यांना त्रास दिला जात असला तरी न्यायालयीन लढाईत ते यशस्वी होतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Story img Loader