Jayant Patil on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याने राज्यसभ संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरलं असून सार्वजनिक बांधकाम खात्याने यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. आज महाविकास आघाडीचे नेते आदय ठाकरे यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्याचवेळी नारायण राणेही तिथे आल्याने गोंधळ निर्माण झाला. तब्बल दोन तास आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर थांबून होते. अखेर ते तेथून निघाले असून त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान, जयंत पाटीलही त्यावेळी राजकोट गडावर पोहोचले होते. त्यांनीही संवाद साधला.

“छत्रपती शिवाजी महाराजंविरोधात अनेक लढाया झाल्या. पण त्यांनी की हार पत्कारली नाही. म्हणून महाराष्ट्र नावाचं राज्य निर्माण करण्याचं श्रेय दैवत शिवाजी महाराजांकडे जाते. आज दुर्दैवाने महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि पडला. भ्रष्टाचाराच्या सर्व घटना होत होत या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाही भ्रष्टाचार केला. म्हणूनच ही घटना घडली”, असं जयंत पाटील म्हणाले.

When the rains return now there is a cyclone warning
Maharashtra News : पावसाच्या परतीची वेळ असताना आता चक्रीवादळाचा इशारा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Narayan Rane in malvan
Narayan Rane : “एक-एकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
president droupadi murmu
President Droupadi Murmu : “बस आता खूप झालं”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संतप्त प्रतिक्रिया; ‘या’ मुद्द्यावर केलं भाष्य!
Uddha Thackeray slams Mahayuti govt
MVA on Chhatrapati Shivaji Statue Collapse: तेव्हा कोश्यारींची टोपी कशी नाही उडाली? उद्धव ठाकरे यांची खोचक टीका
Aaditya Thackeray On Narayan Rane
Aaditya Thackeray : “आपला मोर्चा होता, पण काही चिंधी चोर…”, आदित्य ठाकरेंची राणेंवर बोचरी टीका

हेही वाचा >> Narayan Rane : “एकेकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

झाड पडलं नाही, पण…

ते पुढे म्हणाले की, “या घटनेच्या चौकशीसाठी सरकराने निवृत्त न्यायाधीश आणि सरकारी हस्तक्षेप नसेल अशी समिती नेमावी. नौदलाला सूचना देऊन काही उपयोग नाही. नौदलाला बदनाम न करता सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेली भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे. या सराकने देशभरात केलेल्या बांधकामातील सुमार दर्जा देशातील जनतेच्या लक्षात आलेला आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची परिस्थिती पाहिली. अशा पद्धतीचे लोक महाराष्ट्रावर राज्य करत आहेत. ४५ किमी वारे वाहिले म्हणून पुतळा पडला, असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्या दिवशी २८ किमी ताशी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागातलं पडलं नाही. पण पुतळा पडला. ज्या बाजूने वारा येत होता, त्याच बाजूला पडला. या सर्वांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आणि सरकारची आहे”, असंही ते म्हणाले.

“स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे. या भागातले मंत्री म्हणतात की काहीतरी चांगलं घडायचं असेल तर…, महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोष्ट होऊ शकते, महायुतीचं सरकार जनता गाडून देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल”, असंही ते म्हणाले.