महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसत आहे. बुधवारी (२४ ऑगस्ट) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव लवकर चर्चेसाठी घेण्याची मागणी केली. यावर नार्वेकरांनी तुमचं समाधान होईल असं उत्तर घेऊ, असं उत्तर दिलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटलांनी आक्षेप घेत खोचक प्रश्न विचारला. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

जयंत पाटील म्हणाले, “अध्यक्ष महोदय आपल्याबद्दल मला आदरच आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मात्र, मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देत आहात?”

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Dhananjay Munde On Beed Guardian Minister Ajit Pawar
Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वतः बीड जिल्ह्याचं…”

जयंत पाटलांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मी महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून अशी हमी देतो की मंत्र्यांकडून तुमचं समाधान होईपर्यंत उत्तर घेऊन.”

हेही वाचा : “जयंतराव असं का करता, मी अख्खा मुख्यमंत्री…”, एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही समाधान होईपर्यंत मंत्र्यांकडून उत्तर घेऊन असं म्हटलं पाहिजे. तुम्ही मंत्र्यांना दम देऊन उत्तर द्यायला सांगितलं पाहिजे. त्यांना दमात ठेवा.” यावर नार्वेकरांनी तुमचं समाधान होईल अशी उत्तरं घेऊ म्हटलं.

Story img Loader