अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

दरम्यान, निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकूमशहा असा केला. ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. अजित पवार गटाच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP MLA Munirathna Naidu
BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

“लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं, ही शरद पवारांच्या कामाची शैली आहे. त्यांनी हुकूमशहा प्रवृत्तीने कधी निर्णय घेतला, असं मला कधी जाणवलं नाही. पण सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शरद पवार जे निर्णय घ्यायचे, त्यानंतर त्यावर कुणी मतं व्यक्त करायची नाहीत. शरद पवारांचा तो निर्णय अंतिम असायचा,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.