लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : शिक्षणाचा दर्जा व आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तत्कालिन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात राबवलेला जयंत पॅटर्न राज्यभर राबवण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

2019 scholarship scheme helps meritorious students from marginalized groups study abroad
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
reality of unemployment Even the highly educated are lining up for the Chief Minister Yojandoot
बेरोजगारीचे दाहक वास्तव… ‘मुख्यमंत्री योजनादूत’ साठी उच्चशिक्षितही रांगेत; राज्यात ५० हजार जागांसाठी…
Devendra Fadnavis supports Nerul proposal to provide stipends for new lawyers
वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार,उपमुख्यमंत्री फडणवीस
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Due to Union Home Minister Amit Shahs visit administration denied protest permission at golf club
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांची निदर्शने
tanaji sawant health minister
“लवकरच आरोग्य हक्क कायदा”, ‘जनस्वास्थ्य’च्या प्रकाशन सोहळ्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा
Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात ‘माझी शाळा आदर्श शाळा’ व ‘स्मार्ट पीएचसी’ हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले.

आणखी वाचा-मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली, सरकारला दिलेली १३ जुलैपर्यंतची मुदत संपायला अवघे सात दिवस

जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आधी गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य कर्मचारी भरती अशा विविध गोष्टी केल्या गेल्या.

या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला. तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे तर तसेच ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे.